रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

माळशिरस येथील सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी

 अकलूजचे अविनाश जाधव यांनी ओर्कुटवरती  लिहिलेल्लीहिलेला लेख
२४ सप्टेंबरला मी सत्यशोधक समाज्याच्या १३७ व्या वर्धापन दिनासाठी " महात्मा फुलेवाडा , पुणे " येथे सत्यशोधक समाज्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो...
तेथे बाबा आढाव यांनी " पुरोगामी सत्यशोधक " हे त्रेमासीख प्रकाशित केले त्यात अकलूज येथील सखुबाई ( सकवार ) महादजी निंबाळकर यांची भग्न समाधी बाबत प्रबोधन पर लेख होता या अंकाचे मुखपृष्ठच या समाधीच्या फोटोने आहे..



बाबांनी ( बाबा आढाव ) सखुबाई महादजी निंबाळकर यांचा इतिहास सांगितला .... हा इतिहास आणि ती भग्न समाधी पाहून मन सुन्न झाले..

प्रथमच मराठा असल्याची लाज वाटली...

त्या नंतर अंकाच्या चार प्रती घेऊन घरी गेलो... झोप काही लागली नाही...

अकलूजचे जेष्ठ नेते मोहिते पाटील यांना पत्र लिहिले...
पण राजकीय परिस्थिती पाहता हे काम सामाजिक लोकांनाच करावे लागेल हे लक्षात आले...

चार दोन थोरा मोठ्यांना भेटलो... पण त्यांना इतर बरेच व्याप असल्याने .. फार कोणी काळजी पूर्वक लक्ष दिले नाही ...!!!!!!

बाबा आढावाना पुन्हा व्यक्तीशः भेटायचे ठरवले..
बाबा आढावानी आनदाने पाठींबा दिला ....

तुम्ही तरुण मंडलीनीच हे काम आता पाहायला हवे " अकलूज परिसरातील सर्व सामाजिक शिवप्रेमींना एकत्र करून या दुर्लक्षित शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार करा... मी सोबत आहेच .. " असा मोलाचा पाठींबा त्यांनी दिला...

त्या नंतर शाहीर राजेंद्र कांबळे यांची भेट घेतली त्यांनी हि पुढाकार घेण्याचा शब्द दिला...
पंढरपुरचे युवानेते अमरजित पाटील यांनीही सक्रीय पाठींबा दिला आहे.

या नंतर या समाधीचे संशोधक गोपाळराव देशमुख यांना त्यांचे पंढरपुरचे घरी भेटायला गेलो त्यांनी फारच तळमळीने सारी माहिती दिली....

ती मी येथे लिहिणार आहेच ...

 या नंतर मी फलटणच्या शाही समाधीला भेट दिली आणि माळशिरसला जाऊन सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी हि पहिली..


एकीकडे संगमरवरी शाही निंबालकरी समाध्या आणि दुसरीकडे त्याच घरात दिलेल्या शिवकन्या सखुबाई निंबाळकर यांची भग्न समाधी पाहून


आज हि ब्राह्मणी मानसिकता मराठा समाज्याच्या ऐतिहासिक वारशांचे किती नुकसान करत आहे याची तीव्र जाणीव झाली..
.
या सामाजिक क्रांतीला दडपण्यासाठी त्या समाधीला वाळीत टाकावे !!!!!!!!!!!!!! एवढे दुर्लक्षित करावे कि तेथे अक्षरशः हागणदारी व्हावी !!!!!!!!!!!!!!!!!


वेड्या बाबळीने वेढलेल्या या जेष्ठ शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे .......


हा ऐतिहासिक वारसा असा भग्न होत असताना आपण शिवप्रेमी गप्प बसूच कसे शकतो ????????????


या वेड्या बाबळीने वेढलेल्या भग्न समाधीचा एकही काटा जर आमच्या मनाला टोचत नसेल तर आमची मने पुन्हा एकदा तपासावी लागतील...

आपण काय करू शकतो......

१. आधी येथे प्रातःविधीला बसणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे लागेल कि बाबानो हे थांबवा ...
२. या साठी प्रथम त्या जागेच्या मालकांना या समाधीचे महत्व पटून द्यावे लागेल ते काम मी १५ डिसेंबर नंतर करणार आहे..
३. जागेचे मालक हे शिव प्रेमी तसेच सामाजिक जाणीव असणारे आहेत त्या मुळे फार त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे.
४. या नंतर त्या जागेवर तर काम्पौंद करावे लागेल आणि एक मोठा माहिती फलक लावावा लागेल..
५. छोटासा प्रबोधन पर कार्यक्रम ठेवावा लागेल.... जन जागृती करावी लागेल..
६. त्या नंतर या जागेची स्वच्छता करावी लागेल.
७. या नंतर जीर्णोद्धारासाठी निधी उभारावा लागेल...
८. येथून पुढे जीर्णोद्धाराची खरी सुरुवाट होईल....

यासाठी समाधी परिसरातील शिवप्रेमींना सहभागी होण्यासाठी प्रबोधन करायचे आहे ते मी करत आहेच ....

संदर्भ  : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5540033853785670369&start=1 

२ टिप्पण्या: